तेजोमय सावरकर
कितीतरी सुललित सहज गीती तार न बहु ताणी | ताणीशी तनु बीन तुटे शिथिल तरी गीती नुठे | अति ते ते करत हानी || मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं आणि अजूनही मराठी रसिक आणि देशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे महाकवी-नाटककार-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! देहाकडून देवाकडे जाताना मध्ये माझा देश लागतो आणि या देशाचे मी देणे लागतो! या एका वाक्यामध्ये ओतप्रोत देशभक्तीचा आविष्कारर दिसून येतो. सावरकरांच्या लेखणीतून अवतरलली गीते-नाटके-साहित्य यामध्ये एक वेगळी वक्त, जिद्द, आशा आणि देशभक्ती भरलेली असते. भारताच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही क्रांतिकारकाला न मिळालेव ली पन्नास वर्षे काळ्यापाण्याची तीव्र शिक्षा, अंदमानातील त्या भयानक तुरुंगामध्ये झालेले अनन्वित शारीरिक छळ सोसूनही "या तुरुंगात येऊन मला एक वर्ष झाले आहे, आणि पुढची एकोणपन्नास वर्ष मी या तुरुंगात काढणार आहे. पण मी या तुरुंगात असेपर्यंत माझ्या भारत भूमीवर या इंग्रजांचे सरकार टिकून राहणार आहे काय?" असे ते नेहमीच म्हणत. सर्व कष्ट, हाल-अपेष्टा सोसत असताना मातृभूमीच्या ओढीने घेतलेली सागरी झेप...