संगीत मानापमान
आज संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर तशी free च होते मी. एखादं पुस्तक घेऊन वाचत बसावं असा विचार करत असताना मला माझ्या गुरु डॉ. वंदना घांगुर्डे दीदी यांचा फोन आला. "अगं अनुश्री, संह्याद्री लाव आपलं नाटक "संगीत मनापमान" लागलं आहे. तुला चंदू डेगवेकर नानांना बघायचं आहे ना? लवकर लाव बरं नाटक!" अर्थात क्षणाचाही विलंब नं करता मी संह्याद्री लावलं. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या तेजस्वी लेखणीतून अवतरलेलं आणि गोविंदराव टेंबे यांच्या संगीताचं लेणं ल्यालेलं अजरामर नाटक "संगीत मानापमान"! नाटक लावल्या लावल्या ऐकायला मिळालं ते "धैर्यधरांचं" "चंद्रिका ही जणू". माझे गुरु डॉ. रवींद्र घांगुर्डे गुरुजी यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका आणि धैर्यधरांची सर्वच पदे आम्हां सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुखद पर्वणीचं असते. "मा. दीनानाथ मंगेशकर" यांनी साकारलेली धैर्यधरांची भूमिका, आणि धैर्यधरांची पदे, यांबद्दल आम्ही आमच्या गुरुजींकडून नेहमीच ऐकत आणि शिकत असतो. मा. दीनानाथ मंगेशकरांचा अलौकिक दैवी सुर साऱ्या विश्वावर राज्य करीत आहे. "चंद्रिका ही जणू...